Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

Thursday, April 7, 2016

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा


     आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपलेपणा वाटण्याचे कारण, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. 
    चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या, त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.
    त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.
    वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.
    गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात, धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात. या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते, त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात.
     गुढी हे ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

Tuesday, March 22, 2016

होलिका दहन



होलिका दहन
गोधूलि युक्त प्रदोष वेला में होलिका दहन शास्त्रों के अनुसार रहेगा। इससे पहले साल 1954 में भी ऐसा ही योग बना था। तब भी प्रदोष व्यापिनी प्रतिपदा में ही होलिका दहन श्रेष्ठ माना गया था। जबकि 22 मार्च को पूर्णिमा प्रदोष व्यापिनी है, इसलिए इस बार 23 मार्च को होलिका दहन का श्रेष्ठ मुहूर्त है, क्योंकि इस दिन वृद्धि गामिनी पूर्णिमा है, जो भद्रामुक्त है।




होलिका दहन का पौराणिक महत्व

होली का त्यौहार बुराई पर अच्छाई की जीत और एकता का प्रतीक है। होलिका दहन पर किसी भी बुराई को अग्नि में जलाकर खाक कर सकते हैं। माना जाता है कि पृथ्वी पर एक अत्याचारी राजा हिरण्यकश्यपु राज करता था। उसने अपनी प्रजा को ईश्वर की जगह सिर्फ अपनी पूजा करने को कहा था, लेकिन प्रहलाद नाम का उसका पुत्र भगवान विष्णु का परम भक्त था। उसने अपने पिता के आदेश के बावजूद भक्ति जारी रखी, जिसके लिये पिता ने प्रहलाद को सजा देने की ठान ली और प्रहलाद को अपनी बहन होलिका की गोद में बिठाकर दोनों को आग के हवाले कर दिया। होलिका को ईश्वर से यह वरदान मिला था कि उसे अग्नि कभी नहीं जला पाएगी। लेकिन दुराचारी का साथ देने के कारण होलिका भस्म हो गई और प्रह्लाद सुरक्षित रहे। उसी समय से हम समाज की बुराइयों को जलाने के लिए होलिका दहन मनाया जाता है। 
संपुर्ण भारत में पहले दिन होलिका दहन और दूसरे दिन होली खेली जाती है। इन दिनों प्रकृति भी अपने सबसे अद्भुत रंग बिखेरती है। पतझड़ के बाद पेड़ों पर नई पत्तियां खिलती हैं, जो जीवन में नये उत्साह का संचार करती है।

हेलिकोत्सव की सबको शुभकामनाएँ!!!


होळीच्या शुभेच्छा

       होळी उत्सव

  होळी उत्सव हा महाराष्ट्रातील खूप जुना उत्सव आहे. या दिवसासोबत भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीची गाथा जुळलेली आहे. राजा हिरण्यकश्यपु यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा चांगलाच भक्त होता. हिरण्यकश्पुने कठोर व्रत करून ब्रम्हा देवा कडून अजरामर होण्याचे वरदान मिळवले होते. त्या वरदानामुळे त्याला त्याचा कोणत्याही शत्रुकडून आणि अस्त्राकडून धोका नव्हता. तेव्हापासून तो स्वतःलाच देव समजत होता. आणि आपलीच पूजा करायला भाग पाडत होता. त्याच्या राज्यात फक्त त्याचीच भक्ती केली जात होती. कोणी त्याच्या आदेशाचे पालन नाही केले तर कठीण सजा मृत्यू दंड  होत असे. अशा परिस्थितीत भक्त प्रल्हादचा जन्म झाला आणि सर्व परिसर हा विष्णू भक्ती मध्ये लीन झाला. प्रल्हाद यांस लहानपणापासून देवभक्तीची ओढ होती, ते नेहमी विष्णू भक्तीत लीन राहायेचे. जेवा हिरण्यकश्यपुला समजले कि आपला मुलगा हा वाम मार्गाला म्हणजेच विष्णूच्या नादाला लागला आहे. तेव्हा त्याने प्रल्हादाला समजावले माझ्यापेक्ष्या कोणीही मोठा नाही मलाच देव मान, तो विष्णू माझ्यासमोर काहीच नाही. मी अजरामर आहे. सर्व देव मला मानतात. प्रल्हाद ऐकायला तयार नव्हता, त्याला राजपाट  आणि राक्षसी वृतीत रस नव्हता. हिरण्यकश्यपुने त्याची बहिण होलिका हिला बोलविले आणि आदेश केला. ती म्हणाली दादा तू चिंता करू नकोस मला वरदान आहे, मी कधीही अग्नीचा भक्ष बनणार नाही. तू लाकडांची होळी तयार कर, येणाऱ्या पौर्णिमेला प्रल्हाद याला मांडीवर घेवून मी बसेन. त्याचा अंत करून देव तूच आहेस हे सिद्ध करीन. शेवटी तो दिवस आला. अग्नी लावण्यात आली, पाहतात तर काय आग भडकली प्रल्हाद आपले विष्णू नामस्मरणात लीन होते. एकदम होलिका ओरडायला लागली. मी जळतेय वाचवा, वाचवा. आणि होलिका जाळून राख झाली. त्या सोबत तिचा गर्व ही नाश पावला. तिला वरदान होते तिच्या बचावासाठी, पण तिने त्याचा दुरुपयोग केला म्हणून तिचा अंत झाला. भक्त प्रल्हाद सुखरूप होता
            होळी हा उत्सव  हेच सांगतो, सगळे वाईट विचार आचार हे होळी सोबत दहन करा आणि चांगेल गुण धारण करा


होळीच्या पवित्र आग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो.
व सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो.

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!