Showing posts with label द्राक्ष. Show all posts
Showing posts with label द्राक्ष. Show all posts

Monday, April 4, 2016

नाशिकची ओळख : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया



नाशिक : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया

    वाईन म्हटले की नाशिक असे समीकरण झाले आहे. नाशिक जिल्ह्या देशातील सर्वांत जास्त वाईनरी कंपन्या असल्याने देशाचे वाईन कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 1999 ते 2009 या कालावधीत 35 वाईनरी प्रकल्प सुरू झाले. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला येण्यामागे येथील भौगोलिक वातावरण आणि पूरक सोयी सुविधा हे प्रमुख कारण आहे.
    नाशिक हे देशाचे वाईन कॅपीटल म्हणून ओळखल्या जाण्यामागची गेल्या दशकातील वाटचाल विलक्षण आहे. १९९९ ते २००९ या दशकात जिल्ह्यात ३५ वाईनरी सुरू झाल्या. २० हजार लिटर ते ५० लाख लिटरपर्यंत वाईन्स निर्मितीची क्षमता या वाईनरीत आहेत. महाराष्ट्र द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणामुळे हे घडले. २००१ ला द्राक्ष प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वी नाशिकला फक्त पिंपेन को-ऑपरेटिव्ह लि. आणि सामंत सोना वाईन्स लि या दोनच वाईनरी होत्या. यानंतर २००१ ला धोरण जाहीर झाल्यानंतर 33 वाईनरी प्रकल्प उभारले गेले.
    नाशिकला व्यवसाय निमित्ताने येणा-या विदेशी पाहुण्यांचे या वाईनरी आकर्षण बनल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि कोकणातून येणारे उद्योजक तसेच येथील व्यावसायिकही नाशिकच्या वाईन उद्योगांना भेटी देतात, वाईन  व फुडचा आस्वाद घेतात.     नाशिकच्या वाईन्स विदेशी लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत; नाशिकच्या वाईन उद्योगातील भरारीमुळे भारतात उच्च प्रतीची वाईन निर्माण होते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतीय वाईन उद्योगांत विदेशी गुंतवणूक व्हावी, वाईन पर्यटन वाढावे आणि रिसोर्टस्‌ हा आता प्रमुख उद्योग होण्याच्या दिशेने येथील वाईन-यांचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. देशभरात वाईन्सची विक्री वाढू लागली आहे. जिल्ह्याच्या वाईन उद्योगाची वाटचाल अवघी १२ वर्षाची म्हणजे जेमतेम एक तपाची आहे. वाईनला जागतिक मार्केट उपलब्ध हो शकल्यास आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये नाशिकच्या भारतीय वाईन्सला जागा मिळाल्यास अल्पावधीत नाशिकची वाईन जागतिक स्तरावर स्वताची ओळख निर्माण करु शकेल. अशा स्थितीत नाशिकचा वाईनरी उद्योग आहे.
    मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात सुमारे पाचशे एकरावर शारडोने, शेने ब्लॉक, स्टीन, सोव्हिनिओ ब्लॉंक, रिझलिंग, सेमिलॉन, ट्रिबिआना, व्हिओनये, पालोमिनो, शिराज आदी जातीच्या, वाईनरीसाठी उपयुक्त असणाऱ्या द्राक्षांची लागवड करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात वाईनरीच्या द्राक्षे विक्रीत अडचणी निर्माण झाल्यानंतर या वाईनरीच्या वाणांच्या द्राक्ष बागा तोडण्यात आल्या, त्यात 1-2 एकरावर लागवड केलेल्या द्राक्षबागांची संख्या मोठी आहे.
    जगाच्या द्राक्ष उत्पादनात नाशिकचा ६० टक्के वाटा असल्याने नाशिकला द्राक्षपंढरी म्हटले जाते. या द्राक्षपंढरीत जानेवारी ते एप्रिल पर्यंत द्राक्ष काढणीचा हंगाम असतो आणि हाच हंगाम द्राक्ष उत्पादकांचा उत्सव असतो. या कालावधीत सुमारे ५ ते ६ हजार द्राक्ष कंटेनर्सची निर्यात होते. या हंगामात पोषक हवामान व उत्तम वातावरण असल्याने देश विदेशातील पर्यटकही येतात. यामुळे या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी आयोजित केलेल्या वान महोत्सवाला वा प्रेमींनी उदंड प्रतिसाद मिळाला. नाशिकची नवीन ओळख निर्माण व्हावी. नाशिकचा ब्रॅण्ड निर्माण करणे, कृषी पर्यटनाला चालना देणे, देशात शेतीला पर्यटनाची जोड देणे, पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करणे, नाशिकची शेती व शेतीतन पर्यटन उद्योग, नाशिकचे वातावरण, येथील माती व माणूस यांचा मिलाफ करणे, मानवाला निसर्गाशी जोडणे, वानचा विकास, वान उद्योगाला हातभार लावणे, वानचे मार्केटींग, वान सोबत येथील खाद्य संस्कृती स्थानिक कला अविष्कार यांना प्राधान्य देणे हे या वाईन फेस्टीव्हल भरवण्यामागचे उद्देश असते.
      वानची गोड-आबट झिंग आणणारी चव... पेंटाग्राम बॅण्डच्या साथीने धरला जाणारा ताल...
देशी, परदेशातील रॉकस्टार्सचा धुंद करणारा रॉक जल्लोष... रामाला कुंद हवेतील टेन्ट आणि
वानच्या विविध रंगांत मिसळून रंगीबेरंगी प्रकाशातील आनंद... अर्थातच हा माहोल आहे आपल्या नेहमीच्याच सुला फेस्टचा. नाशिकची नवी ळख असलेला सुला फेस्ट फेब्रुवारीला नाशिकच्या सुला विनियार्डमध्ये भरवला जातो. वानप्रेमी मोठ्या संख्येने यात सहभागी होतात.
    जगभरातील अव्वल पाच वाइन फेस्टिव्हलमध्ये गणना होणाऱ्या सुला फेस्टमध्ये नामवंत कलाकार द्वारे सादर होणारे विविध रॉक बॅण्डचा आनंद रसिकांना लुटता येतो. वानच्या चवीसोबतच तरुणाईला थिरकण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रिक्स डान्स म्युझिक सिस्टिम (ईडीएम), एल अॅक्टोस्टिक के वन पी म्युझिक सिस्टिमचा भारतात प्रथमच वापर गेली. त्यासोबतच स्थानिक टॅरकार्ड शो, टॅट्यूज, फॅशनशो अन‌् बरेच काही, विनियार्डमध्ये सुमारे चार एकर जागेवर फूड स्टॉल, शॉपिंग स्टॉल, वारली पेंटींग कलाकारांचीही साथ लाभल्याने आदिवासी संस्कृती, भारतीय परंपरा आणि ग्लोबलायझेशन असे कॉम्बिनेशन येथे बघायला मिळते.